Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RamdasAthwaleNewsUpdate : Video : रामदास आठवले यांनी अशी कविता पेश केली की, सगळी राज्यसभा हसली !!

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभेचे अधिवेशन म्हटले  की , सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता गाजल्या नाहीत असे सहसा होत नाही यावेळीही त्यांनी आपल्या खास शैलीत राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या स्वागतासाठी आपली कविता  पेश करून नेहमीप्रमाणे सर्व सदस्यांना मनमूराद हसविले.


सभागृहात बोलताना रामदास आठवले म्हणाले, “जर तुम्ही मला जास्त बोलू दिलं तरच मी कविता ऐकवेन नाहीतर एकही कविता ऐकवणार नाही. ” लोक मला विचारतात की तुमच्या पार्टीचा लोकसभेत एकही सदस्य नाही, तरी तुम्ही मंत्री कसे काय? मी त्यांना सांगतो हे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाऊन विचारा.” यानंतर आठवलेंनी कविता सादर करण्यास सुरुवात केली.

रामदास आठवले म्हणाले,

“आदरणीय महोदय,

मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,

इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,

आपका अनुभव बहुतही बडा है,

इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,

मेरे पार्टी का मैं हू अकेला,

लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,

मैं तो हूँ आपका सच्चा चेला,

मुझे मत छोडो अकेला.

जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,

उनका नाम है धनकड

हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,

इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड

हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,

उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन

हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,

क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”

दरम्यान, रामदास आठवले आपली कविता सादर करत असताना इतर खासदार त्यांना अधूनमधून दाद देत होते. याचबरोबर, रामदास आठवले पुढे म्हणाले, “तुम्ही मोठा संघर्ष करून याठिकाणी पोहोचला आहात, गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते इथपर्यंत तुम्ही उच्च पदापर्यंत आला आहात. तुमचा अनुभव आणि संघर्ष मोठा आहे. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काम करणं अवघड होतं. पण तुम्ही ते आव्हान लीलया पेललं. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं म्हणूनच तुम्ही इथेपर्यंत पोहोचू शकला आहात. तिथे तुम्ही चांगलं काम केलं नसतं, तर कदाचित तुम्हाला हे पद मिळणं अवघड होतं.”

कविता सादर केल्यानंतर रामदास आठवले धनकड यांना उद्देशून पुढे म्हणाले, “आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही संघर्ष करत, करत इथंपर्यंत पोहचला आहात. गावातील शेतकऱ्याच्या मुलापासून आपण एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचला आहात. यामध्ये तुमचा अनुभव आणि फार मोठा संघर्ष आहे. खूप मोठं कार्य तुम्ही केलं आहे. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल पदावर जे कार्य केलं आहे, तिथे फार मोठं आव्हान होतं. तिथे काम करणे फार अवघड होते, मात्र तुम्ही बंगालमध्ये फारच चांगलं काम केलं आहे. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं त्यामुळे तुम्हाला इथे आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. तुम्ही एक संघर्षशील नेते आहात, जर तिथे तुमचे काम ठीक नसते, तर कदाचित हे पद तुम्हाला मिळणं फार अवघड होतं. पण तुम्ही चांगलं काम केलं आहे.”

याचबरोबर, “मी शिर्डीत हारलो, पण मी घरात बसलो नाही. मी फिरत राहिलो, फिरत राहिलो. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेसचे माझे सर्व मित्र आहेत. समाजवादी पार्टीचे माझे मित्र आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे माझे मित्र आहेत आणि आता भाजपाचे माझे मित्र आहेत. आता भाजपासोबत मी आलो आहे आणि यासाठी आलो आहे कारण मला शिर्डीत हरवलं गेलं, मला मंत्री नाही बनवलं. मग मी तिकडे काय करू?. त्यामुळे मला काँग्रेसला सोडावं लागलं.” असंही आठवले यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय, “मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास, दिसतोय सगळा प्रकाश. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मी निर्णय घेतला. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि सत्तेत यायलं हवं असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. माझा एकटा पक्ष सत्तेत येऊ शकत नाही, कुणासोबत मिळूनच सत्तेत येऊ शकतो.” असंही ते म्हणाले.

“मला विचारलं जातं की तुमच्या पार्टीचा एकही सदस्य लोकसभेत नाही, तरीही तुम्ही मंत्री कसे काय? तर मी म्हणालो की तुम्ही नरेंद्र मोदींना जाऊन विचारा. मी कसा काय मंत्री आहे. मी एकटाच आहे परंतु माझ्या पक्षाचे लोक संपूर्ण देशभर आहेत. मला बोलण्याची संधी द्या, मला माहीत आहे की तुम्ही फार चांगले व्यक्ती आहात. तुम्ही मला नेहमी म्हणायचा की आम्हाला कविता ऐकवा. जर तुम्ही मला जास्त बोलू दिलं तरच मी कविता ऐकवेन नाहीतर एकही कविता ऐकवणार नाही.” असं शेवटी आठवले म्हणताना दिसले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!