Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharNewsUpdate : २०१४ मध्ये आलेला माणूस २०२४ मध्ये जिंकेल का ? शपथ घेताच नितीशकुमार यांचा भाजपवर हल्ला बोल

Spread the love

पाटणा : नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर  तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राबडी देवी आणि जीतन राम मांझी यांच्यासह बिहारमधील अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नेते नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या ‘महागठबंधन’सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत.


तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि आठव्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. वास्तविक, नितीश कुमार यांनी मंगळवारी दोनदा राज्यपालांची भेट घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी एनडीए आघाडीचे नेतृत्व करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला, तर दुसऱ्यांदा तेजस्वी यांनी विरोधी महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांसह राजभवनात जाऊन १६४ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर केली. राज्यपाल सध्या बिहार विधानसभेत २४२ सदस्य आहेत आणि बहुमत मिळवण्याचा जादुई आकडा १२२ आहे. जे त्याने साध्य केले आहे.

भाजपवर जोरदार हल्ला…

शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नितीश कुमार म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात मी मीडियाशी बोलणे बंद केले होते. तुम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना विचारा की सगळ्यांचे काय झाले. मला २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. पण तुमची  काळजी घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता. नंतरच्या काळात जे काही घडते ते सर्वजण पाहत होते. आमच्या पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावरून आम्ही वेगळे झालो.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, २०१५ मध्ये आम्ही किती जागा जिंकल्या? आणि मग आम्ही त्याच लोकांसोबत गेलो आणि बघा की आम्ही कमी झालो आहोत.” “मी राहीन की नाही, लोकांना जे म्हणायचे आहे ते सांगू द्या” नितीश कुमार पुढे म्हणाले की “मला पंतप्रधानपदासाठी रस नाही.  २०१४ मध्ये आलेला माणूस २०१४ मध्ये जिंकेल का हा प्रश्न आहे.

नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राबडी देवी आणि मांझी यांच्यासह बिहारमधील अनेक बडे नेते उपस्थित होते. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या ‘महागठबंधन’सह हे सरकार स्थापन केले आहे. ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत.

उल्लेखनीय आहे की, नितीश कुमार यांनीही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर आमदारांसोबतच्या बैठकीत आरोप केला होता की ते सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!