Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर , जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

– अनिल परब राजभवनाकडे रवाना …

– अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यास परवानगी

– खा. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही त्यांनी सत्तेचे दलाल म्हणून टीका केली. संभाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही राजकीय दुकानदारी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फोटोला बुटा -चपलांचे हार घालून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाका असे आवाहन करीत असताना उस्मानाबाद आणि औरंगाबाद मधील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

३० वर्षे चुकीच्या लोकांसोबत राहून आता धर्मनिरपेक्ष बनू, असे सांगणारे आम्ही ज्यांचे समर्थन करत आहोत, ते शेवटच्या दिवशी हे करत आहेत याचे मला वाईट वाटते: अबू असीम आझमी

  • मी शरद पवार आणि सोनिया गांधी यांना सांगू इच्छितो की सरकार आमच्या पाठिंब्याने अस्तित्वात आहे…जर सरकारने असे पाऊल उचलले तर आम्ही कुठे जाणार?…मी शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण यांना सांगू इच्छितो. , बाळासाहेब थोरात, आम्ही काय करू? मुस्लिमांना बाजूला केले जात आहे. मी निषेध करतो: अबू आझमी

– आज उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. भाजप असो वा एमव्हीए – जे कुबड्यांवर चालत आहेत – मुस्लिमांना बाजूला करायचे आहे: अबू असीम आझमी, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार

– विवेक फणसाळकर मुंबईचे नावे पोलीस आयुक्त

– आमदारांचे मुंबईत परतणे आणि फ्लोअर टेस्टच्या दृष्टीने पोलिसांनी पूर्ण तयारी केली असून या बंदोबस्तात डीसीपी स्तरावरील आणि त्यावरील २० अधिकारी, ४५ एसीपी स्तरावरील अधिकारी, २२५पोलिस निरीक्षक, ७२५ एपीआय/पीएसआय, २५०० पोलिस कर्मचारी, १२५० एलपीसी कर्मचारी, एसआरपीएफच्या १० कंपन्या आणि ७५० कर्मचारी अतिरिक्त दल यांचा समावेश आहे.

शिंदे गटाचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल …
उद्या फ्लोर टेस्टपूर्वी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीसाठी महाराष्ट्र भाजपचे आमदार मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहोचू लागले आहेत.

– रामशास्त्री बाण्याने न्यायालयाने निकाल दिला तर शिवसेनेचा विजय होईल. : संजय राऊत

– संजय राऊत म्हणाले कि , एक सुसंकृत मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे . त्यांनी काहींना मुलासारखं, काहींना मित्रासारखं, काहींना भावासारखं सांभाळलं. पण काहीही न पटणारी कारणं देऊन ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. दगाबाजीचा नवा अध्याय लिहिला गेला. औरंगजेबानं जशी संभाजी महाराजांची हत्या करवली, तशीच हत्या या लोकांनी लोकशाहीची केली. औरंगजेब जसा या मातीत गाडला गेला, त्याच पद्धतीने हे सगळे स्वत:ला बंडखोर समजतात, त्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावा लागेल. हे तुम्ही खरंच राष्ट्रीय हेतूने केले, की यामागे स्वार्थ होता वा अन्य काही होते  याची उत्तरे त्यांना द्यावी लागतील.

– संजय राऊत यांची पत्रकार परिषद

– मुख्यमंत्री  मात्रोश्रीवर पोहोचले

– सर्वांचा निरोप घेऊन मुख्यमंत्री मंत्रालयातून मातोश्रीकडे रवाना.

– मुख्यमंत्र्यांनी सर्व घटक पक्ष आणि सर्व अधिकारी , कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सर्वांचे सहकार्य मिळाले परंतु माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला डाग दिला असे मुख्यमंत्री म्हणाले . उद्याच्या फ्लोअर टेस्ट मध्ये काय होईल ते बघू. हि शेवटची बैठक आहे असे आता म्हणता येणार नाही.

–   जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

– मुख्यमंत्र्यांनी मानले सर्वांचे आभार !
– आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला मंजुरी देण्यात आली. यासोबतच उस्मानाबादचं नाव धाराशीव तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर.

‘पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा’ कॉंग्रेस मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी
‘शिवडी-न्हावाशेवा लिंक रोडला अंतुलेंचं नाव द्या’ ‘नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव द्या’

कॅबिनेट बैठक सुरु

उद्या मुंबईत पोहोचून विश्वासदर्शक ठरावात सहभागी होऊ. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल: एकनाथ शिंदे, गुवाहाटी विमानतळावर

– बंडखोर शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतून निघाले, गुवाहाटीतून स्पेशल चार्टर विमानाने गोव्याला जाणार

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल

– आज संध्याकाळी ५ वाजता मंत्रिमंडळ बैठक : CMO

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचं नामकरण धाराशीव तर नवी मुंबई विमानतळाचं नाव दिबा पाटील विमानतळ करा, या निर्णयांवर शिवसेना ठाम, कॅबिनेटच्या बैठकीत मागणी करणार

– बिहारचे चार AIMIM आमदार RJD मध्ये सामील.

– उदयपूर । आतापर्यंत दोन मुख्य आरोपींशीवाय, आम्ही इतर तिघांना आमच्या ताब्यात घेतले आहे, ज्यांच्याशी ते संपर्कात होते: राजस्थानचे डीजीपी एमएल लाथेर

– पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा.

– उदयपूर । कन्हैया लाल तेलीच्या हत्येप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनआयएची पथके आधीच उदयपूरला पोहोचली असून या प्रकरणाच्या जलद तपासासाठी आवश्यक कारवाई आधीच सुरू केली गेली आहे: राष्ट्रीय तपास यंत्रणा

– उदयपूर | ज्यांनी त्याचा (कन्हैया लाल) खून केला त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे आम्हाला न्याय हवा: कन्हैया लालची पत्नी

– या कृत्याचा निषेध… ” हे केवळ भ्याड कृत्य नाही तर इस्लामविरोधी कृत्य” – जामा मशिदीचे शाही इमाम

– उदयपूर | या दहशतवादी हल्ल्याला राजस्थान सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. राजस्थानमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. राज्यात दहशतवादी संघटना फोफावत आहेत आणि राज्य सरकारने त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चिथावणी दिली आहे: भाजप नेते राज्यवर्धन राठोड


MaharashtraPolticalCrisis LIVE Updates : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष

MaharashtraPolticalCrisis LIVE Updates : सर्वात मोठी बातमी : बहूमत चाचणी उद्याच होणार , सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय …


– आज संध्याकाळी ५ वाजता मंत्रिमंडळ बैठक : CMO

– राजस्थानमधील उदयपूर येथे काल झालेल्या कन्हैया लाल तेलीच्या निर्घृण हत्येचा तपास एमएचएने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हाती घेण्याचे निर्देश.

– उदयपूर हत्त्या प्रकरण | कन्हैया लालला त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती पण कोणत्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई केली नाही माहीत नाही: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!