MaharashtraNewsUpdate : राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक
मुंबई : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. स्वत: बच्चू कडु यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये कडू यांनी म्हटले आहे कि , माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मातोश्रींच्या पार्थिवावर उद्या रविवार १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुंर तालुक्यातील बेलोरा या गावी सकाळी १० वाजता अंत्यविधी होईल, अशी माहितीही कडु यांनी दिली आहे.
माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.
अंत्यविधी:- १३-०३-२२ रविवार
बेलोरा ता. चांदुर बाजार जि. अमरावती
सकाळी १० वाजता pic.twitter.com/4AnpdQXBj4— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 12, 2022