Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादीत दाखल

Spread the love

मुंबई : आज अखेर घोषित केल्याप्रमाणे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुरेखा पुणेकर यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले कि , ‘सुरेखा पुणेकर यांचे मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्य सरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतर‌ही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा‌ सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे, ही आदरणीय शरद पवारसाहेबांची भूमिका आहे.’

अजित पवार पुढे म्हणाले कि , ‘आज पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

या नेत्यांचाही प्रवेश

दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे अशी सूचनाही केली. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता. या प्रवेश सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत केले.


टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात.

पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.

पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे.

जाणून घेऊ या टर्म इन्श्युरन्स विषयी.

टर्म इन्शुरन्सची गरज काय?

टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं.

“घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते”

“घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत कमी असो किंवा जास्त, इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय आहे टर्म इन्शुरन्सचा.”

“कमी हप्त्यात मोठा फायदा इथं मिळत असतो. त्यासाठी हा इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे,”

इन्शुरन्स उचलतो आर्थिक जबाबदारी

अलीकडे शहर असो किंवा ग्रामीण भाग. जवळ जवळ प्रत्येकावर गृहकर्ज असतं. त्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप मोलाचा आहे. कर्जाची परतफेड ही मोठी आर्थिक जबाबदारी आहे. काही लाखांत किंवा कधी कधी कोटींमध्ये ही कर्जाची रक्कम असते.
दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कर्ज फेडण्यापूर्वीच झाला तर? ही कल्पना भयावह आहे. कारण, हा भार आता त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार आहे.
“पण, टर्म इन्शुरन्स एकरकमी पैसे देत असल्यामुळे तुम्ही गेल्यानंतरही ही जबाबदारी इन्शुरन्स घेतो,” बने यांनी टर्म इन्श्युरन्सचा आणखी एक फायदा सांगितला.

टर्म इन्शुरन्स किती रकमेचा हवा यावरही त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन विषद केला. “एक पद्धत आहे ज्यात तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात हे महत्त्वाचं ठरतं. त्या काळात तुम्ही जमा केलेली रक्कम आणि पुढच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विम्याची रक्कम ठरवणं ही ती पद्धत.”
टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्यं
टर्म इन्शुरन्सचं महत्त्व आपण समजून घेतलं. आता बघू या त्याची वैशिष्ट्यं

टर्म इन्श्युरन्सचा हप्ता तुलनेनं अगदी कमी असतो.
कमी हप्त्यात विमा संरक्षण मात्र तगडं मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जीवंत असाल तर लाभ मात्र मिळत नाही.
ज्याच्या नावावर टर्म इन्श्युरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची पूर्ण रक्कम मिळते
काही टर्म प्लानबरोबरच अतिरिक्त फायदे(ज्यांना रायडर बेनिफिट म्हणतात) मिळत असतात. उदा. थोडा जास्त हप्ता भरलात तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.
हे इन्श्युरन्स देणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे
मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही
टर्म इन्शुरन्सबद्दल हे माहीत आहे का?
टर्म इन्शुरन्समुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचं साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात.

म्हणून हा इन्श्युरन्स कमावत्या व्यक्तीच्या नावे घेतला जातो.

वाढत्या वयाबरोबर टर्म इन्शुरन्सचा प्रीमिअम वाढत जातो. जशी मुदत संपल्यावर तुम्हाला जिवंत असताना लाभ मिळत नाही, तसंच या विम्यावर तुम्हाला कर्जाची उचलही करता येत नाही.
चला मग आजच आपण आपला टर्म विमा काढून घेऊ आणि आपल्या सोबत आपल्या परिवाराची काळजी घेऊ.

Contact
Swara Financial Services
Vishal Kharat
Insurance & Investment Advisor
Mob.- 9421911143

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

आपलं सरकार

Click to listen highlighted text!