Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नाशिक दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू , मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

Spread the love

या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!”  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


नाशिक : नाशिकमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेमध्ये तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “ही अतिशय दु:खद घटना असून करोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणे  हे अतिशय दुर्दैवी आहे”, असे सांगून  भुजबळ म्हणाले कि , या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून तीन सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. “ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणे  गरजेचे  आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत”, असे  भुजबळ यावेळी म्हणाले.

“ही अतिशय दु:खद घटना घडली आहे. नाशिक महानगर पालिकेचं हे झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे. इथे १५० रुग्णांची क्षमता आहे. तरी देखील इथे १५७ रुग्ण दुर्घटनेवेळी रुग्णालयात होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते. १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. १५७ रुग्णांपैकी ६३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती”, अशी माहिती यावेळी छगन भुजबळ यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!