Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोर्टाने खडसावल्यानंतर दाभोळकर-पानसरे खटल्याची काय आहे प्रगती ?

Spread the love

मुंबई :  दाभोळकर-पानसरे हत्याकांडातील खटले सुरु करण्यास तयारी असल्याची माहिती सीबीआय आणि एसआयटीने  मुंबई उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. पुणे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयातील खटल्यांवरील स्थगितीसाठी केलेले अर्ज तपास यंत्रणांकडून मागे घेण्यात आले आहेत. तसेच पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या हत्या आणि वर्षानुवर्ष तपास रखडणे  ही बाब निंदनीय असल्याचे  हायकोर्टाने  म्हटले  आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे गेली चार वर्ष  दाभोळकर-पानसरे प्रकरणी रखडलेले खटले आता पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


यासंदर्भात तपासयंत्रणांनी खटल्याच्या स्थगितीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचे  मंगळवारी हायकोर्टाला सांगितले . न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर यावर सुनावणी सुरु होती. या याचिकेला या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांच्यावतीने विरोध करण्यात आला होता. ही माहिती न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी तपासयंत्रणांनी सादर केली.

खटला चालवण्यासाठी तपास यंयंत्रणांची तयारी 

दरम्यान दोन्ही तपास यंत्रणांनी मंगळवारी तपासाचा आपला प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. ज्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडाचा तपास करणाऱ्या सीबीआयने  कोर्टाला कळवले आहे  की, मारेकऱ्यांसह अन्य सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून ते खटला चालवण्यासाठी तयार आहेत. तर कॉम्रेड पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीने  कोर्टाला कळवले  की याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार आहेत. मात्र त्यांना फरार दाखवत तेही खटला चालवण्यास सज्ज आहेत. त्यामुळे आता लवकरच पुणे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयात पुन्हा या खटल्यांवर नियमित सुनावणी सुरु होईल. मात्र या दोन्ही प्रकरणांचा तपासही समांतर सरुच राहील, असे  सीबीआय आणि एसआयटीनं कोर्टाला आश्वासन दिले  आहे. तरीही पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या अशाप्रकारे हत्या होणे  आणि त्याच्या तपासांत वर्षानूवर्ष प्रगती न होणे  ही बाब अतिशय निंदनीय असल्याचं मत यावेळी हायकोर्टाने  व्यक्त केले आहे.

कुटुंबीयांनी उपस्थित केले हे प्रश्न 

डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी तपासयंत्रणेच्या कारभारावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुण्यात साल 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानंतर   2015 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंना कोल्हापुरात मारण्यात आले . मात्र तपास यंत्रणा अजूनही अपयशीच असल्याचा, याचिकाकर्त्या कुटुंबियांचा आरोप आजही कायम आहे. मात्र या दोन घटनांनंतर शेजारील राज्यात डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांत तपास पूर्ण होऊन खटल्याला सरुवातही झाली. तिकडच्या तपासयंत्रणांनी इथे  येऊन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तिथं त्यांच्या चौकशीत ईकडच्या या दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यामुळे नक्की राज्यातील तपास यंत्रणा काय करत आहेत?, यावर मुंबई उच्च न्यायालयाने  तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही तपास यंत्रणांना गंभीर होण्याचा इशारा देत जलदगतीने  तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!