Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतकऱ्यांच्या नाकाबंदीवरून राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर प्रहार !! तोडगा काढा , त्यांचा आवाज दाबू नका

Spread the love

आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दूरवस्था करत आहात, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली.

पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि , ‘सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरते का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांचा आवाज दाबणे , मारणे आणि धमकावणे सरकारचे काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे काम करावे . शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणे हे देशासाठी योग्य नाही’, अशा शब्दांत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या केंद्राच्या भूमिकेची निंदा केली. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुमचे काम आहे त्यांच्या हिताचा विचार करणे . या एक टक्के लोकसंख्येसाठी तुम्ही देश विकू शकत नाही. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पावलोपावली मोदी सरकारला निशाण्यावर घेतले . ‘मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो ते कुठेही जाणार नाहीत अखेर एक दिवस सरकारलाच मागे हटावे लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या’, अशा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि , देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 99 टक्के जनतेला आधार दिला जाणे अपेक्षित होते. पण, इथे मात्र 1 टक्के जनतेलाच आधार मिळत आहे. मध्यमवर्गीय जनता, कामगार, शेतकरी यांच्या वाट्याचा पैसा ठराविक अशा 10-15 लोकांच्याच वाट्याला गेला. देशाच्या सरकारकडून जनतेच्या हातात पैसा दिला जाण्याची गरज होती. लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देत अर्थव्यवस्थेला गती देणे अपेक्षित होते. पण, इथे मात्र उलट चित्र पाहायला मिळाले असे म्हणत त्यांनी रुतलेल्या अर्थचक्राकडे साऱ्यांचे लक्ष वेधले.

चीनकडून देशाच्या भूभागात वारंवार घुसखोरी केली जात असताना संरक्षणार्थ तुटपूंज्या रकमेचीच तरतूद केंद्रानं केल्याची बाब अधोरेखित करत राहुल गांधी यांनी जर संरक्षण यंत्रणा देशाप्रती सर्वस्व अर्पण करत असतील तर इथं सरकारकडून 110 टक्के समर्पकता दाखवली गेली पाहिजे असा सूर आळवला. संरक्षण यंत्रणांच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत यावर ते आग्रही दिसले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!