Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं काय लिहिलंय पत्रात ?

Spread the love

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात कायमच शीतयुद्ध चालू असल्याची प्रचिती येत आहे . मग तो विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न असो कि सध्या चालू असलेल्या मंदिराच्या चर्चेचा. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात कायम दुरावा आहे त्यामुळे नेहमीच यांच्या संबंधाच्या ठिणग्या कायम उडताना दिसतात.  राज्यपालांनी राज्यातील मंदिरं खुले करण्यावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले . या पत्रावरून चर्चा सुरु झाली आहे . खरे तर ती झाली नसती तर नवल होते . दरम्यान राज्यातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपनं राज्यात आंदोलन सुरु केलं आहे. याच, पार्श्वभूमीवर राज्यपालांनीही मंदिरांबाबत मुख्यमंत्रांना पत्र धाडलं आहे.

राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.’ तसंच, ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हेही माझ्या हिंदुत्वात बसत नाही,’ या कंगनाभेटीवरही  त्यांनी टिप्पणी केली आहे. ‘Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

माझे राज्य , माझी जबाबदारी

या पत्रात ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो,’ असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या पत्रातून माझे राज्य माझी जबाबदारी असल्याचीच आठवण या निमित्ताने त्यांना करून दिली आहे. ‘जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!