Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शासनाला कोट्यावधींचा चुना, मुख्यवनसंरक्षकांना अचानक जाग, कोविड मुळे चौकशी लांबल्याचा खुलासा

Spread the love

औरंगाबाद – गेल्या तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणा दरम्यान अजिंठा ते सिल्लोड या रस्त्यावरील झाडांची कत्तल केलेले २२ हजार घनमीटर लाकूड लंपास झाल्या प्रकरणी सिल्लोड पोलिस आणि वनविभागाने तक्रार प्राप्त झाल्यावरही गुन्हा दाखल केला नाही.या प्रकरणी फिर्यादी न्यायालयात धाव घेत असल्याची कुणकुण लागताच विभागिय वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करु असा खुलासा केला. तर पोलिस अधिक्षक कार्यालयाने या प्रकरणी त्वरीत दखल घेत असल्याचे सांगितले.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , वनपरिक्षैत्र सिल्लोड मधील कर्मचार्‍यांनी लाकडांच्या ठेकेदारांच्या संगनमताने २२हजार७३६ घनमीटर लाकडाची वाहतूक परवानगी असतांना केवळ ६हजार घनमीटर लाकूड रेकाॅर्डवर घेतले व उर्वरित लाकूड दुचाकी, जप्त केलेल्या ट्रक यांचे क्रमांकाचे परवाने जारी करुन लंपास केले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांना फिर्यादीने अर्ज दिला होता.तसेच विभागीय  वनसंरक्षक कार्यालयात ही धाव घेतली. दोन्ही ठिकाणी तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे कळतांच फिर्यादी न्यायालयात दाद मागत आहे असे समजताच वनविभाग व पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागली.याचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाने हरियाणातील ऋत्वीक लॅन्को ला दिला. तर तोडलेली वृक्ष विकण्याचा ठेका नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या जय बाबाजी फायरवूड सप्लायर्सला दिला होता. या फर्मचे मालक उत्तम बच्छाव यांनी साथीदारांना सोबंत घेत १८हजार घनमीटर लाकडाची विल्हेवाट लावली. या प्रकरणात लतीफ सय्यद कोपरगाव, संतोष पैठणकर,सुरेश शिंदे आणि जाकिर शेख,सत्तार शहा, आसाफ शेख सर्व रा. येवला, यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. वरील सर्व आरोपींनी स्कूटी, मोटरसायकल, पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक चे वाहतूक परवाने तयार करुन कागदोपत्री लाकूड वाहतूक केल्याचे दस्तऐवज तयार करुन शासनाला सादर केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर या प्रकरणात झालेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे.वनविभागाचे प्रमुख वनसंरक्षक प्रकाश महाजन म्हणाले की, वनविभागातील बहुतांश अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह होते. त्यामुळे चौकशीला उशीर झाला.पण येत्या महिन्याभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई केली जाईल तर पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे म्हणाले की,उद्या त्वरीत या अर्जाच्या चौकशीचे स्टेटस काय आहे. याची माहिती घेऊन खुलासा केला जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!