Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात दिवसभरात 459 तर देशभरात 1 हजार 129 रुग्णांचा मृत्यू , दिवसभरात आढळले 19 हजार 164 नवे रुग्ण

Spread the love

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुधारणा दर वाढल्यामुळे दिलासादायक वातावरण असतानाच राज्यात करोना मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. आज दिवसभरात आणखी 459 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत या संसर्गाने 34 हजार 345 जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या 2068 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनाचा कहर चालूच असून गेल्या 24 तासात 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित  रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 82 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आत्तापर्यंत 9 लाख 73 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 74 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात बरे होण्याचं प्रमाण हे 75.86 एवढं झालं आहे. तर मृत्यू दर 2.68 एवढा आहे. देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 24 तासांत 86 हजार 506 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 57 लाखावर पोहोचला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 90 आणि त्यानंतरच्या आठवड्यात 97 हजारापर्यंत दिवसाला रुग्ण वाढत होते. मात्र आज हा आकडा कमी असून केवळ 86 हजार 506 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान देशात सध्या 9 लाख 66 हजार 382 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे 24 तासांत 1, 129 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतही संख्या 91 हजार 149 वर पोहोचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!