Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMahrashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले २२ हजार ५४३ रुग्ण , ४१६ जणांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात आढळलेल्या २२,५४३ रुग्णांमुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १०,६०,३०८वर पोहोचली आहे. तसेच आज ११,५४९ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७,४०,०६१ झाली आहे. त्याचबरोबर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५२,५३,६७६ नमुन्यांपैकी १०,६०,३०८ (२०.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील करोनाबाधितांचे बरे होण्याचे आजचे प्रमाण ६९.८ टक्के नोंदवले गेले असून दिवसभरात ११,५४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २२,५४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ४१६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यू दर २.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.  दरम्यान, सध्या राज्यात १६,८३,७७० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३७,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तसेच राज्यात सध्या २,९०,४३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील करोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही. राज्यात काल २२ हजाराहून अधिक रुग्ण सापडलेले असतानाच आज पुन्हा २२ हजार ५४३४१६ जणांचा नवे रुग्ण सापडले आहेत. तर आज राज्यात ४१६ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे. राज्यात ४१६ नवीन मृत्यूंची नोंद झाल्याने करोनाने दगावलेल्या रुग्णांचा एकूण आकडा २९ हजार ५३१ इतका झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.७९ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५२ लाख ५३ हजार ६७६ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ६० हजार ३६० चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ९० हजार ३४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू असून ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. तर आज ११,५४९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या राज्यात१६,८३,७७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३७,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ नमुन्यांपैकी १० लाख ६० हजार ३०८ नमुने पॉझिटिव्ह ( २०.१८ टक्के) आले आहेत. राज्यात १६ लाख ८३ हजार ७७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार २९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७९ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २२,५४३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२०८५ (४१), ठाणे- ३०८ (१), ठाणे मनपा-३७८ (११), नवी मुंबई मनपा-४०३ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५३३ (४), उल्हासनगर मनपा-७३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-१९१ (३), पालघर-२२० (३), वसई-विरार मनपा-२१३ (६), रायगड-६८२ (६), पनवेल मनपा-२३५, नाशिक-१९५ (८), नाशिक मनपा-७१३ (७), मालेगाव मनपा-४०, अहमदनगर-६२० (५),अहमदनगर मनपा-१९२ (७), धुळे-१०८ (१), धुळे मनपा-६४ (१), जळगाव-९८१ (१०), जळगाव मनपा-१३१ (३), नंदूरबार-१२४ (१), पुणे- ११२६ (१५), पुणे मनपा-२२९४ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-१००४ (२), सोलापूर-६३० (१४), सोलापूर मनपा-६३ (१), सातारा-९१२ (१९), कोल्हापूर-४३८ (१६), कोल्हापूर मनपा-२४० (२), सांगली-६४६ (१६), सांगली मिरज कुपवाड मनपा-५६२ (९), सिंधुदूर्ग-५३, रत्नागिरी-२९२, औरंगाबाद-२५६ (२),औरंगाबाद मनपा-४२९ (२), जालना-१११ (३), हिंगोली-७१ (३), परभणी-१२१, परभणी मनपा-३८, लातूर-२१५ (४), लातूर मनपा-१०८, उस्मानाबाद-२४९ (८), बीड-२१३ (५), नांदेड-८६ (२), नांदेड मनपा-१०७ (२), अकोला-३४ (१), अकोला मनपा-९२(५), अमरावती-१८३ (६), अमरावती मनपा-१९४ (५), यवतमाळ-२२९, बुलढाणा-२४२ (५), वाशिम-१०१ (१), नागपूर-४४८ (४), नागपूर मनपा-१५३४ (६९), वर्धा-८१ (१), भंडारा-१९१ (१३), गोंदिया-९०, चंद्रपूर-१२१ (५), चंद्रपूर मनपा-१२० (४), गडचिरोली-५१, इतर राज्य- ४३.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!