Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : JEE आणि NEET परीक्षा ठरलेल्या वेळेवरच , आदित्य पाठोपाठ सोनू सूदचीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Spread the love

सर्वोच्च न्ययालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (JEE ) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आले  आहे. याबाबत एनटीएकडून वेबसाईटवर अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून  एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान न्यायालयाने आदेशित करूनही कोरोनाच्या पार्शवभूमीवर  जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. याबाबत युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रिया, विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करून ती पुढे ढकलावी  अशी मागणी केलेली असतानाच  आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानेही ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. कोरोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे. सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.

केंद्र सरकार मात्र या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. या दरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने हिनेही  भारताच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

दरम्यान या आधीच परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना करोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रिया, विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांची प्रवेश प्रक्रि या स्थगित करून ती पुढे ढकलावी. त्याचबरोबर जून २०२० पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी करोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. देशभरातील कोटय़वधी विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीवजा मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!