Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या अभ्यासावरून उघड झाली हि धक्कादायक माहिती, सावध राहण्याचा इशारा …

Spread the love

राज्यातीळ कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या अभ्यासावरून  धक्कादायक माहिती उघड झाली असून या माहितीनुसार आतापर्यंत  दगावलेल्या ३० टक्के कोरोनाभाधिट रुग्णांमध्ये इतर कोणत्याही आजाराची लक्षणे नव्हती,  हे रुग्ण केवळ कोरोनानेच दगावले असल्याने कोरोना आजार हा जीवघेणाच असून या आजाराला सहज घेऊ नका,  असे अभ्यासकांनी म्हटले आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूचे  विश्लेषण करण्यासाठी राज्यस्तरावर एका समितीची स्थापना करण्यात आली असून  त्यानुसार आतापर्यंत ४ हजार १४४ मृतांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. या अहवालानुसार ४ हजार १४४ पैकी ३० टक्के म्हणजे १ हजार २४७ लोकांना करोना व्यतिरिक्त करोणताही आजार नसल्याने त्यांचा मृत्यू केवळ कोरोनामुळे झाला तर २ हजार ८९८ रुग्णांना म्हणजे ७० टक्के लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्याचे अभ्यासात निदर्शनास आलं आहे.

याशिवाय अभ्यासात असेही आढळून आले आहे कि , केवळ ज्येष्ठ नागरिकांचाच करोनामुळे मृत्यू होतो असं काही नाही तर  कोणत्याही वयाच्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. रुग्णालयात भरती करताना रुग्णांना करोनाशिवाय कोणताही आजार नव्हता. मात्र तरीही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांना तर मधुमेह व इतर आजार असल्याचं दिसून आलं. मात्र, त्याची रुग्णाला काहीही माहिती नव्हती. याचा अर्थ करोनाने रुग्णाचा मृत्यू झाला, पण त्याला इतरही आजार होते, हेच माहीत नसल्याचंही आढळून आलं आहे. या शिवाय अनेकदा शेवटच्या स्टेजला असताना रुग्णालयात येणं, त्यामुळे उशिरा उपचार होणं ही सुद्धा मृत्यूची कारणं असल्याचं करोना डेथ कमिटीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं.

अभ्यासकांच्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत मुंबईत ५ हजार ९८१ लोक दगावले. त्यात ४ हजार ८७९ लोक ५० वर्षावरील होते. म्हणजे ८१ टक्के लोक ५० हून अधिक वयाचे होते. दरम्यान, राज्यात करोनामुळे काल आणखी २५७ रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता १३ हजार ३८९ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६५ इतका मृत्यूदर आहे. राज्यात काल दिवसभरात ९२५१ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांना राज्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी दिलासा देणारी बाब म्हणजे आज ७२२७ रुग्ण करोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९२० जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ३ लाख ६६ हजार ३६८ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४५ हजार ८९१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात सर्वाधिक ४६ हजार १३ रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र तिथे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यानंतर ठाण्यात ३६ हजार ६७८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर मुंबईत तुलनेने कमी म्हणजेच २२ हजार ८५४ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये करोनाचा सध्या वेगाने फैलाव होत असून नागपूर वगळता बाकी जिल्ह्यांत दोन हजार ते पाच हजार इतके करोना बाधित रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाण्याच्या तुलनेत या भागांत आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने त्याचाही मोठा फटका बसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!