Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात 235 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 7753 कोरोनामुक्त, 4486 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 575 जणांना (मनपा 354, ग्रामीण 221) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 7753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 324 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12671 झाली आहे. आजपर्यंत एकूण 432 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4486 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 235 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 44, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 109 आणि ग्रामीण भागात 64 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण (15)

खिंवसरा पार्क (1), मर्चंट बँक परिसर, मोंढा (1), मिसारवाडी (1),  एअर इंडिया कार्यालयामागे (1), आरेफ कॉलनी (1), तापडिया प्राईड परिसर, पैठण रोड (1), अन्य (1), छावणी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भोईवाडा (4), नंदनवन कॉलनी (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (67)

जिकठाण (1), सोयगाव (1), रांजणगाव (1), औरंगाबाद (10), सिल्लोड (1), खुलताबाद (3), फुलंब्री (1), पैठण (8), गंगापूर (30), वैजापूर (11)

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (44)

सारा वैभव (1), सिद्धार्थ नगर (1), वाळूज (4), बजाज नगर (3), वडगाव (1), पद्मपुरा (2), चित्तेगाव (1), आडूळ (1), पंचशील नगर (2), पंढरपूर (1), जुना मोंढा (1), मोंढा नाका (1), एकलहरा (1), सिल्क मिल कॉलनी (2), कांचनवाडी (2), पडेगाव (3), भावसिंगपुरा (2), जातेगाव (1), गोपाळपूर (6), राजीव गांधी नगर (3), राम नगर (2), शेंद्रा (1), वैजापूर (1), अन्य (1)

कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत हर्सुल टी पॉइंट येथील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!