Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusMharashtraUpdate : राज्यातील कोरोनग्रस्तांची संख्या ५२ हजारावर , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Spread the love

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ वर पोहोचली असली तरी कालच्या तुलनेने आज नव्याने आढळलेल्या रुग्णांचा वेग कमी झाला असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यानुसार राज्यात आज २४३६ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले असून  दिवसभरात ६० रुग्ण दगावले आहेत. त्यात एकट्या मुंबईतच ३८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ११८६ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आरोग्य मंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एका दिवसात राज्यभरातून ११८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. दरम्यान आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये ( ७८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३१,९७२ (१०२६)

ठाणे: ४५७ (४)

ठाणे मनपा: २७३९ (३८)

नवी मुंबई मनपा: २०६८ (३२)

कल्याण डोंबिवली मनपा: ९४१ (८)

उल्हासनगर मनपा: १८० (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ९८ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४७५ (५)

पालघर:१२० (३)

वसई विरार मनपा: ५९७ (१५)

रायगड: ४३१ (५)

पनवेल मनपा: ३६० (१२)

ठाणे मंडळ एकूण: ४०,४३८ (११५४)

नाशिक: १२३

नाशिक मनपा: १२९ (२)

मालेगाव मनपा: ७२१ (४४)

अहमदनगर: ५७ (५)

अहमदनगर मनपा: २०

धुळे: २३ (३)

धुळे मनपा: ९५ (६)

जळगाव: ३०१ (३६)

जळगाव मनपा: ११७ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १६१८ (१०३)

पुणे: ३६० (७)

पुणे मनपा: ५३१९ (२६०)

पिंपरी चिंचवड मनपा: ३१७ (७)

सोलापूर: २४ (२)

सोलापूर मनपा:५९९ (४०)

सातारा: ३१४ (५)

पुणे मंडळ एकूण: ६९३३ (३२१)

कोल्हापूर:२४४ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ७२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी: १६७ (४)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५२७ (६)

औरंगाबाद:२६

औरंगाबाद मनपा: १२६३ (४८)

जालना: ६३

हिंगोली: १३२

परभणी: १८ (१)

परभणी मनपा: ६

औरंगाबाद मंडळ एकूण: १५०८ (४९)

लातूर: ७४ (३)

लातूर मनपा: ८

उस्मानाबाद: ३७

बीड: ३२

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (५)

लातूर मंडळ एकूण: २४९ (८)

अकोला: ३६ (२)

अकोला मनपा: ३८४ (१५)

अमरावती: १५ (२)

अमरावती मनपा: १६७ (१२)

यवतमाळ: ११५

बुलढाणा:४१ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:७६६ (३४)

नागपूर: ७

नागपूर मनपा: ४६८ (७)

वर्धा: ६ (१)

भंडारा: १४

गोंदिया: ४३

चंद्रपूर: १५

चंद्रपूर मनपा: ९

गडचिरोली: १५

नागपूर मंडळ एकूण: ५७७ (८)

इतर राज्ये: ५१ (१२)

एकूण: ५२ हजार ६६७ (१६९५)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!