Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaLatestUpdate : एक नजर : जाणून घ्या , देश -विदेश , महाराष्ट्र आणि तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाची ताजी स्थिती….

Spread the love

ताज्या बातम्या….

अकोल्यात आणखी ७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३६२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२८ आहे.

चंद्रपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या १३ झाली आहे. मुंबईत कार्यरत असलेली पण मूळची चंद्रपुरातील २१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये काम केल्यावर तिथेच २२ दिवस क्वारंटाईन झाली होती. १६ मे रोजी शहरात स्वतःच्या घरी परतली. पण २० मे रोजी लक्षणे वाटू लागल्याने स्वतःच सामान्य रुग्णालयात दाखल झाली. तिथे स्वॅब घेतल्यावर आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

औरंगाबादेत २३ नवे बाधित; जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या झाली १२४१

हिंगोलीमध्ये नव्याने ६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात औंढा तालुक्यातील एक तर वसमत तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथून आपल्या गावी आले होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. त्यापैकी ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

धुळ्यात आणखी २१ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, रुग्णांचा आकडा १०२ वर

राज्यात करोना रुग्णांची विक्रमी वाढ, एकाच दिवसात आढळले २९४० पॉझिटिव्ह

रत्नागिरीत आढळले करोनाचे आणखी सात रुग्ण. गुहागर, दापोली, रत्नागिरीत प्रत्येकी दोन तर संगमेश्वरात एका रुग्णाची नोंद. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३२ वर. आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू तर ३७ रुग्ण करोनामुक्त.

सोलापूर शहर पोलिसात आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा गुरुवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं काल आलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. याआधी शहर पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोलापुरातील दोघां पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पर्यंत शहर पोलीस दलातील एकूण १५ कर्मचारी कोरोना बाधित आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित १० जणांवर उपचार सुरू आहेत.


Maharashtra  : Total Cases: 44582 | Deaths: 1517  | Recovered: 12583

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद  शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७  पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९) , ठाणे: ३६६ (४), ठाणे मनपा: २२३४ (३३), नवी मुंबई मनपा: १७७६ (२९), कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७), उल्हासनगर मनपा: १४४ (३), भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३), मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४), पालघर:१०७  (३) ,वसई विरार मनपा: ४५१ (१४) , रायगड: २९९ (५), पनवेल मनपा: २८२ (१२), ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७), नाशिक: ११५ ,नाशिक मनपा: ९३ (२), मालेगाव मनपा: ७१० (४४), अहमदनगर: ४९ (५), अहमदनगर मनपा: २२, धुळे: १७ (३) ,धुळे मनपा: ८० (६), जळगाव: २८६ (३६), जळगाव मनपा: १०९ (५), नंदूरबार: ३२ (२), नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३), पुणे: २८३ (५), पुणे मनपा: ४४९९ (२३१), पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७), सोलापूर: १० (१), सोलापूर मनपा:५२२ (३२), सातारा: २०४ (४), पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०), कोल्हापूर:१७५ (१), कोल्हापूर मनपा: २०, सांगली: ६२, सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१), सिंधुदुर्ग: १०, रत्नागिरी:  १३५ (३), कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५), औरंगाबाद:२२, औरंगाबाद मनपा: ११६५ (४२), जालना: ४६, हिंगोली: ११२, परभणी: १७ (१), परभणी मनपा: ५, औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३), लातूर: ५८ (२), लातूर मनपा: ३, उस्मानाबाद: २६ बीड: २६, नांदेड: १५, नांदेड मनपा: ८३ (४), लातूर मंडळ एकूण: २११ (६), अकोला: ३१ (२), अकोला मनपा: ३३६ (१५), अमरावती: ९ (२), अमरावती मनपा:  १३६ (१२), यवतमाळ: ११३, बुलढाणा:३९ (३), वाशिम: ८, अकोला मंडळ एकूण:६७२ (३४), नागपूर: ३, नागपूर मनपा: ४५७ (७), वर्धा: ३ (१), भंडारा: ९, गोंदिया: २८, चंद्रपूर:  ८, चंद्रपूर मनपा: ७, गडचिरोली: ९, नागपूर मंडळ एकूण:  ५२४ (८), इतर राज्ये: ४८ (११)


एकूण:  ४४ हजार ५८२  (१५१७)


गेल्या २४ तासात भारत

Total Cases: 125,149 | Deaths: 3,728 (7 % )  | Recovered: 51,824 (93 %) 

भारतात गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६,६५४ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासांत एकूण १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०१ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ६९,५९७ सक्रिय रुग्ण आहेत. याबरोबरच आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३,७२० इतकी झाली आहे. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी ५१,७८४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १४ नवीन हॉटस्पॉट्स तयार करण्यात आले आहेत. हे आतापर्यंतच्या दिवसभरातील सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत. यासह दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची एकूण संख्या ९२ वर पोहोचली आहे.दरम्यान, दिल्लीचा एक भाग देखील कंटेनमेंट झोनच्या यादीतून वगळण्यातही आला आहे.

परवा  गुरुवारी कोरोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून करोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला. तर ६,०८८ नवे रुग्ण आढळले, असे आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना सांगितले. देशात एकूण ६६,३३० बरे झाले आहेत. तसेच एक रुग्ण परदेशात रवाना झाला आहे. आतापर्यंत देशातील ४०.९७ टक्के रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. करोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळपासून करोनामुळे मृत्यू झालेल्या १८८ लोकांपैकी महाराष्ट्रातील ६४ रुग्ण, गुजरातमधील २४, दिल्लीतील १८, उत्तर प्रदेशातील ११, तामिळनाडूमधील ७, पश्चिम बंगालमधील ६, तेलंगणातील ५, राजस्थानमधील ४, मध्य प्रदेशातील ३, जम्मू-काश्मीरमधील २, बिहार, ओडिशा, हरियाणा आणि पंजाबमधील प्रत्येकी १ रुग्णांचा समावश आहे.


दुनिया ५३ लाखांच्या वर

Total  Cases : 5,306,928 | Deaths : 340,072 (14% )  | Recovered : 2,160,530 ( 86% )

कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात फैलावला आहे. करोनाच्या संसर्गासमोर अनेक देश हतबल झाले असल्याचे चित्र आहे. करोनाबाधितांची संख्या आता ५३ लाखांहून अधिक झाली आहे. तर, कोरोनाच्या संसर्गामुळे तीन लाख ४० हजार ७२  लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग जगभरातील २१० देशांमध्ये फैलावला आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पाच महिन्यांत जगभरात ५३ लाख ६ हजार ९२८ जणांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाच्या संसर्गावर आतापर्यंत २१ लाख ६० हजार ५३० जणांनी मात केली आहे. अमेरिकेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत १६ लाख ४५ हजार ३५३ लोक कोरोनाबाधित असून ९७ हजार ६५५ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, रशियात तीन लाख जणांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र, मृतांची संख्या रशियात ३२४९ अशी कमी  आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!