देशभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 28, 380 इतकी झाली असून मृत्यूची संख्या 886 इतकी झाली आहे.
तर महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 8,590 इतकी झाली असून मृत्यूची संख्या 369 इतकाही झाली आहे.
आजपर्यंत 1282 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून देशभरातील 6362 रुग्ण उपचारानंतर आपल्या घरी गेले आहेत.
महाराष्ट्रात आज 522 नवीन रुग्णांची भर पडली तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मृत्यू दर 20 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण सुधारण्याचा दार 8 टक्क्यांनी वाढला आहे. तरीही खूप काळजी घेण्याची गरज आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ रुग्ण आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एका रुग्णाला कर्करोग होता.
आज सायंकाळी 4.30 वाजता अपडेट केलेल्या माहितीनुसार जगात 30 लाख 25 हजार 726 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2 लाख 9 हजार 1 अशी मृतांची संख्या आहे. तर 8 लाख 93 हजार 196 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. समाधानाची आणि दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी क्रिटिकल रुग्णांची संख्या आता केवळ 3 टक्के इतकी असून मृत्यू दारात सुद्धा 1 टक्क्याची कमी आली आहे.
अपडेट : दि. २७.०४.२०२० । सायंकाळी ६.०० वाजता । आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन
अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
१ मुंबई मनपा ५७७६ २१९
२ ठाणे ४० २
३ ठाणे मनपा २९५ ४
४ नवी मुंबई मनपा १३५ ३
५ कल्याण डोंबिवली मनपा १४५ ३
६ उल्हासनगर मनपा २ ०
७ भिवंडी निजामपूर मनपा १४ ०
८ मीरा भाईंदर १२१ २
९ पालघर २५ १
१० वसई विरार मनपा १२१ ३
११ रायगड १८ ०
१२ पनवेल मनपा ४३ १
ठाणे मंडळ एकूण ६७३५ २३८
१ नाशिक ४ ०
२ नाशिक मनपा १९ ०
३ मालेगाव मनपा १२३ १२
४ अहमदनगर २६ २
५ अहमदनगर मनपा १६ ०
६ धुळे ८ २
७ धुळे मनपा १७ १
८ जळगाव १८ ४
९ जळगाव मनपा २ १
१० नंदुरबार ११ १
नाशिक मंडळ एकूण २४४ २३
१ पुणे ५८ ३
२ पुणे मनपा ९६९ ७४
३ पिंप्री-चिंचवड मनपा ७२ ३
४ सोलापूर ६ ०
५ सोलापूर मनपा ५९ ५
६ सातारा २९ २
पुणे मंडळ एकुण ११९३ ८७
१ कोल्हापूर ७ ०
२ कोल्हापूर मनपा ४ ०
३ सांगली २६ ०
४ सांगली मिरज कुपवाड मनपा १ १
५ सिंधुदुर्ग १ ०
६ रत्नागिरी ८ १
कोल्हापूर मंडळ एकुण ४७ २
१ औरंगाबाद १ ०
२ औरंगाबाद मनपा ८२ ६
३ जालना २ ०
४ हिंगोली ८ ०
५ परभणी ० ०
६ परभणी मनपा १ ०
औरंगाबाद मंडळ एकूण ९४ ६
१ लातूर १० १
२ लातूर मनपा ० ०
३ उस्मानाबाद ३ ०
५ बीड १ ०
६ नांदेड ० ०
७ नांदेड मनपा ३ ०
लातूर मंडळ एकूण १७ १
१ अकोला ११ १
२ अकोला मनपा १८ ०
३ अमरावती १ ०
४ अमवरावती मनपा २१ ७
५ यवतमाळ ६२ ०
६ बुलढाणा २१ १
७ वाशीम १ ०
अकोला मंडळ एकूण १३५ ९
१ नागपूर ४ ०
२ नागपूर मनपा १२३ १
३ वर्धा ० ०
४ भंडारा १ ०
५ गोंदिया १ ०
६ चंद्रपूर ० ०
७ चंद्रपूर मनपा २ ०
८ गडचिरोली ० ०
नागपूर मंडळ एकूण १३१ १
१ इतर राज्य २५ २
एकूण ८५९० ३६९ उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : १२८२