Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १९८२ , काल दिवसभरात सर्वाधिक २२१ रुग्णांची नोंद , मृत्यूचा एकदा १४९

Spread the love

महाराष्ट्रात  काल  दिवसभरात २२१ रुग्णांची नव्याने नोंद झाली  असून दिवसभरात २२ जणांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईत १६ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ९१ रुग्णांचा करोनानं बळी गेला तर राज्यातील मृत्यूचा आकडा १४९ वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या २२ करोना बाधित रुग्णांमध्ये   सर्वाधिक १६ रुग्ण मुंबईचे , पुण्यातील तीन, नवी मुंबईचे दोन आणि सोलापूर येथील एक मृत रुग्णाचा समावेश आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे.


दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार , राज्यात एकूण रुग्ण संख्या १ हजार ९८२ झाली आहे. २१७ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले असून, १ हजार ९८२ जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५ हजार ०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात २२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईचे १६ जण आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत. १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्युमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये (९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरियादेखील होता. करोनामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या १४९ झाली आहे, असेही  टोपे म्हणाले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका १ हजार २९८ (मृत्यू ९२), । ठाणे ०६, ठाणे मनपा ४४ (मृत्यू ०३),

नवी मुंबई मनपा ४५ (मृत्यू ०३), । कल्याण डोंबवली मनपा ४६ (मृत्यू ०२),

उल्हासनगर मनपा ०१, । भिवंडी निजामपूर मनपा ०१,

मीरा भाईंदर मनपा ४२ (मृत्यू ०१), । पालघर ०४ (मृत्यू ०१),

वसई विरार मनपा २१ (मृत्यू ०३), । रायगड ०४, पनवेल मनपा ०८ (मृत्यू ०१),

ठाणे मंडळ, एकूण १ हजार ५२० (मृत्यू १०६), । नाशिक ०२, नाशिक मनपा ०१, मालेगाव मनपा १५ (मृत्यू ०२),

अहमदनगर १०, अहमदनगर मनपा १६, । धुळे ०१ (मृत्यू ०१), जळगाव ०१, जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१),

नाशिक मंडळ, एकूण ४७ (मृत्यू ०४), । पुणे ०७, पुणे मनपा २३३ (मृत्यू ३०), पिंपरी- चिंचवड मनपा २३,

सोलापूर मनपा ०१ (मृत्यू ०१), सातारा ०६ (मृत्यू ०२), । पुणे मंडळ एकूण २७० (मृत्यू ३३), कोल्हापूर ०१, कोल्हापूर मनपा ०५,

सांगली २६, सिंधुदुर्ग ०१, रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१), कोल्हापूर मंडळ, एकूण ३८ (मृत्यू ०१),

औरंगाबाद ०३, औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१), जालना ०१, हिंगोली ०१, औरंगाबाद मंडळ, एकूण २१ (मृत्यू ०१),

लातूर मनपा ०८, उस्मानाबाद ०४, बीड ०१, लातूर मंडळ, एकूण १३, । अकोला मनपा १२, अमरावती मनपा ०५ (मृत्यू ०१), यवतमाळ ०४,

बुलढाणा १३ (मृत्यू ०१), वाशिम ०१, अकोला मंडळ, एकूण ३५ (मृत्यू ०२),  नागपूर ०१, नागपूर मनपा २७ (मृत्यू ०१), गोंदिया ०१, नागपूर मंडळ, एकूण २९(मृत्यू ०१),

इतर राज्ये ०९ (मृत्यू ०१), एकूण १ हजार ९८२ (मृत्यू १४९).

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!