Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : दिलासादायक बातमी : विलगीकरण कक्षात केवळ १०८ लोक तर सर्वाधिक लोक १४ दिवसानंतर आपापल्या घरात : राजेश टोपे

Spread the love

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक ३९ असली तरी १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाइन आहे. त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान यवतमाळ येथे करोना बाधित आढळलेली महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आयटी तज्ज्ञाची  आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण करोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.

आज करोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण करोना बाधित आढळले असून इतर ७ जण करोना निगेटिव्ह आढळले आहेत. पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील १ लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील त्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह 

बुलडाणा जिल्ह्यात परदेशातून आलेल्या ३ रुग्णांवर कोरोना संशयित म्हणून खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते. मात्र या तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट नागपुरहून निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. दुसरीकडे, कोरोना व्हायरस हे संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने आता वेगवान पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सायंकाळी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान पत्र पाठवून श्रींचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून शेगावचे मंदिर २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत संस्थानने मात्र या मेसेजला दुजोरा न देता भक्तांसाठी मंदिर सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानला मंदिर बंद करण्यासंदर्भात आदेश दिले आङेत. शेगाव तहसीलदार बोबडे मॅडम यांनी संस्थानला जाऊन आदेश बजावले. याची कडेकोट अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस चेक पोस्ट लावणार असल्याची माहिती तहसीलदार बोबडे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!