Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाशिकजवळ बस -अॅपे रिक्षाच्या भीषण अपघातात दोन्हीही वाहने विहिरीत कोसळून १९ ठार, ३१ जखमी, जाणून घ्या अपघातग्रस्तांची नावे

Spread the love

एसटी बसचा टायर फुटल्याने बसने अॅपे रिक्षाला धडक दिल्याने मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात चालकासह १९ प्रवासी ठार झाले आहेत. तर ३१ जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक देवळा ग्रामीण रुग्णालय तसेच मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालक पी. एस. बच्छाव या अपघातात ठार झाले असून वाहक कमल लक्ष्मण राऊत या जखमी आहेत. धोबीघाटाजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. मदतकार्यही वेगाने सुरू होते. महाराष्ट्राला हादरावून सोडणारी अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

या अपघाताची अधिक माहिती अशी कि , कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. दुपारी ३.३० च्या सुमारास धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.  त्याचवेळी समोरून येणाऱ्या  एका अॅपे रिक्षाला बसने धडक दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या परिसरात वळली. तिथूनच जवळ एक विहीर होती.  त्यावेळी बस थेट रिक्षाला फरफटत नेते विहिरीच्या कठड्याला धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून  बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ५ क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या बसमध्ये ४३ प्रवाशी होते आणि यात ७ मुलांचा समावेश आहे.

जखमी झालेल्या काही प्रवाशांना मालेगाव  देवळा तर काहींना उमराणे येथे शासकीय रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे. दरम्यान अपघातात बचावलेल्या महिलेने सांगितले कि , दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल कळालचं नाही. फक्त विहिरीकडे बस जाताना दिसली होती. नेमकं काय घडतंय याबद्दल काहीच कळलं नाही. विहिरीमध्ये बस पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. लहान-लहान मुलं होती. सगळे जण वाचवा वाचवा ओरडतं होती. मी कशी बशी खिडक्याला पकडून बाहेर आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!