Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चेहरा झाकून आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते नाहीत, महाराष्ट्र बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Spread the love

मुंबई प्रतिनिधी । पूजा डांगे ।

वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व सुधारणा  कायदा आणि एनसीआर विरोधात पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बंद शांततेत पार पडला असून यावेळी पोलिसांनी वंचितच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांची धरपकड केली. बंद दरम्यान काही लोकांनी चेहरे झाकून दगडफेक केली असून दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत. आम्ही चेहरे झाकून आंदोलन करत नाही, असं सांगतानाच आजचा बंदमागे घेण्यात येत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आजच्या बंद संदर्भात माहिती देतं म्हणले कि,  एनसीआर आणि सीएए विरोधातील वंचितच्या या बंदला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासूनच राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ठाण्याच्या तीन हात नाका येथेही रास्तारोको करत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यातील औरंगाबाद, बारामती, मनमाड, वाडा, पालघर, जालना, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, इंदापूर, गोंदिया, बीड, केज, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून आम्हाला बंदच्या माध्यमातून जो संदेश देशातील जनतेला द्यायचा होता, तो लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा, आंबेडकरांनी केला. या बंदला राज्यातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आंबेडकर यांनी जनतेचे आभारही मानले.

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या या बंदला राज्यातील शंभरहून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेही बंदचा परिणाम अधिक जाणवल्याचं आंबेडकर म्हणाले. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला असूनही या ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलुंड स्टेशन परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मुंबईत विक्रोळी असल्फा व्हिलेज, वरळी, कुर्ला, भायखळा, चेंबूर, गोरेगाव आदी भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही स्वत:हून बंदला पाठिंबा देऊन सहकार्य केल्याचंही ते म्हणाले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा आम्ही शब्द दिला होता. आमचा शब्द आम्ही पाळला. मुंबईत  एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. चेहरा झाकून एका व्यक्तिने ही दगडफेक केली. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चेहरे झाकून बंदमध्ये भाग घेतला नव्हता. चेहरे झाकून आंदोनल करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत आणि ती आमची पद्धतही नाही, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!