Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : सत्ता स्थापनेसाठी आठवले आणि मित्र पक्ष राज्यपालांच्या दरबारी , राज्यपाल म्हणाले ” आठवलेंनी कवितेतून तोडगा सुचवावा …” !!

Spread the love

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कॅरेक्टर आहेत त्यापैकी रामदास आठवले हे एक कॅरेक्टर आहे….राज्यात सरकार बनावे म्हणून ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या भाजप सेनेकडून हालचाल होण्यापेक्षा शरद पवार आणि रामदास आठवले यांचीच नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोठी धडपड चालू आहे. 

खरे तर रामदास आठवलेंना प्रतिक्रिया देण्यासाठी कुठलाही विषय तास वर्ज्य नसतो . पत्रकारांनी त्यांना काही विचारायचा अवकाश कि , लगेच स्टार्ट होतात आता तर ते महायुतीचे मित्र पक्ष आहेत. अर्थात मित्र पक्ष आणि कवी म्हणून त्यांचा महायुतीतही  मोठा दारात आहे. प्रारंभी त्यांनी विधान केले होते कि , भाजपने शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद द्यावे . त्यानंतर भाजपचा एकूण राग रंग पाहता त्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती केली कि , शिवसेनेने मूखुमंत्री पदाचा आग्रह धरू नये , नंतर ते म्हणाले कि , रिपाइंला नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे परंतु त्यांच्या लक्षात आले कि , अद्याप सरकारच स्थापन होत नाही मग आता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं मागणी केली आहे कि , राज्याच्या  विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण द्यावे.  शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदं घेऊन भाजपशी तडजोड करून सरकारमध्ये सहभागी व्हावं, असे आवाहनही आठवले यांनी आता केलं आहे.

बेगने शादी मी अब्दुल्ला दिवाना …असे रामदास आठवले यांच्याबद्दल बोलले जाते ते उगीच नाही….

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात रासपचे प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संदीप पाटील, रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, भुपेश थुलकर, गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, एम. एस. नंदा, जगदीश गायकवाड, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचं विधान केलं. निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावं, अशी विनंती आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.

येत्या १० नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट नियमानुसार लागू होऊ शकते यात राष्ट्रापती राजवट लागू करण्याची कोणतीही धमकी नाही, असं मत आठवले यांनी मांडलं. शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदे घेऊन भाजपशी तडजोड करून सरकारमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान राज्यात सरकार लवकर स्थापन झालं पाहिजे. मात्र अद्याप माझ्याकडं कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं. सरकार स्थापन करण्याबाबत चांगला तोडगा रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून द्यावा; ते चांगले कवीसुद्धा आहेत, असं ते म्हणाले.

यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही मित्रपक्षांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना निवेदनाद्वारे केली. राज्यात अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत केंद्रालाही कळवलं आहे, असंही शिष्टमंडळानं सांगितलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात मित्रपक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. सरकार स्थापन करण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!