Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SBI : तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे…

Spread the love

उद्यापासून भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत.या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत भारतीय स्टेट बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा हा या मागचा बँकेचा उद्देश आहे. याचसाठी बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहे. नवे दर उद्या १० ऑक्टोबरपासून अंमलात येत आहेत. मंदीच्या गर्तेत सापडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर या दिवशी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.

रिझर्व बँकेने रेपो दरात २५ आधार अंक घटवून ५.१५ टक्के केला होता. हे पाहता या आर्थिक वर्षातील कपातीचा आकडा १३५ पोहोचला आहे. विशेष म्ह विशेष म्हणजे ९ वर्षांत पहल्यांदाच इतका कमी रेपो दर कपातीचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ( आरबीआय) गेल्याच आठवड्यात अपेक्षेप्रमाणे रेपो दरात कपात केली. या ताज्या दरकपातीला शेअर बाजार आणि डेट मार्केट (ऋण बाजार) या दोन्हीं ठळक ठिकाणाहून नकारात्मक प्रतिक्रिया आली. आरबीआयने सतत प्रत्येक सत्रात रेपोदरात कपात केली आहे. यंदा फेब्रुवारीपासून आढावा घेतल्यास, ही कपात १.३५ टक्के इतकी आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ऑगस्टमध्ये ६.९ टक्के इतका ठरवला, तो आता ६.१ टक्के इतका खाली आणला आहे. सध्याची जागतिक मंदी पाहता ६.१ टक्के वाढीचे उद्दिष्ट साधेल का, याबद्दलही बाजाराला शंका आहेत. त्या आघाडीवर अपेक्षाभंग होऊ शकतो, असे तज्ज्ञ मानतात.

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी एकाने ०.४ टक्के दरकपातीचा आग्रह धरला होता. त्याबाबत समितीने अनुकूलता दर्शविली आहे. याचा अर्थ भविष्यात आणखी दरकपात होऊ शकेल. दरम्यान व्यापारी कर्ज आणि रेपो दर यातील वाढलेली दरी अजून कमी कशी करता येईल, याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच या ताज्या दरकपातीचा फायदा कर्जाचे दर कमी होण्यात होईल आणि अर्थव्यवस्थेला अत्यावश्यक असलेला वेग प्राप्त करून देता येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!