Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा विषय संपला , खा . ओवैसी यांचे शिक्कमोर्तब

Spread the love

https://youtu.be/FTDI8HVkSHk

वंचित बहुजन आघाडीतून अखेर एमआयएम  बाहेर पडले असून  एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असादुद्दीन ओवेसी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी एमआयएम आणि भारिपचा काडीमोड झाला आहे. विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.

पत्रकारांशी बोलताना खा. ओवैसी म्हणाले वंचितशी युतीचा निर्णय आणि किती जागा मागायच्या हा निर्णय इम्तियाज जलील यांना घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा अधिकृत निर्णय आहे. मग आता वंचित आणि एम आय एम ची युती होणार कि नाही ? याविषयी विचारले असता ते म्हणाले कि तो निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा . इम्तियाज जलील यांना आहेत.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण फक्त ओवेसी यांच्याशी बोलू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. ‘आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैदराबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जोपर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम आहे,’ असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी यांनीही जलील यांचा निर्णय अंतिम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे एमआयएम  ने हा निर्णय घेतला आहे.

जागावाटपाबद्दल एमआयएम चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता एमआयएम बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. एमआयएमने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!