रिक्षात बसण्यावरुन झालेल्या कुरबुरीतून चाकूने वार करुन केला मित्राचाच खून, आरोपी गजाआड
औरंगाबाद – कंदूरीच्या कार्यक्रमाला रिक्षात जाणार्या मित्राचा रिक्षात बसण्यावरुन झालेल्या कुरबुरीतून चाकूने वार करुन खून केला. या प्रकरणी मयताचा आईच्या तक्रारीवरुन एकास सिडको पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद आसिफ उर्फ आशू (२३) रा.फाजलपूरा असे मयताचे नाव आहे. तर शेख रेहान शेख पाशू(२४) रा.विश्र्वासनगर लेबर काॅलनी असे अटक आरोपीचे नाव आहे.मयत आणि आरोपी हे दोघे चांगले मित्र होते अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.बुधवारी रात्री ९वा. मोहम्मद आसिफ आपल्या मित्रासोबत रिक्षात बसून गेला.त्यावेळी त्याचे सोबत शेख रेहान, रिक्षाचालक वसीम,सोहेल आणि इब्राहिम ही होते.दरम्यान रात्री १२च्या एस.पी. आॅफीस च्या मेसजवळ रिक्षात बसण्यावरुन आसेफ आणि रेहान यांच्यात बाचाबाची झाली. रागाच्या भरात रेहान ने आसिफवर चाकूचे वार करुन रिक्षातून बाहेर ढकलले.हा प्रकार प्रत्यक्ष दर्शींनी जिन्सी पोलिसांना कळवला.पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी पीएसआय दत्ता शेळके यांना त्वरुत घटनास्थळी पाठवून जखमीला रुग्णालयात पाठवले तर रिक्षातील चौघांना ताब्यात घेतले.पण घटनास्थळ सिडको पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे वरील प्रकरण पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी सिडको पोलिसांकडे सोपवले. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी रिक्षापतील चौघांची चौकशी केली. यावेळी शेख रेहान ने गुन्ह्याची कबुली दिली .दरम्यान रात्री१२.३०वा. मयत आसिफ ची आई नरगिस बेगम मो.खालेद यांना त्यांचा पुतण्या मो. काजीम इसाख याने फोन करुन सांगितले की, आसिफ चे कटकट गेट परिसरात भांडण झाले आहे. या भांडणात त्याला मार लागला व उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणाचा
पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करंत आहेत.