Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : नैराश्य आणि गरिबीला कंटाळून दोन मुली आणि मुलाला गळफास लावून महिलेची आत्महत्या

Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये एका आईने तीन मुलांना गळफास देऊन स्वतः  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप आईने मुलांचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या का केली ? हे स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. त्यांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.

फातिमा अक्रम बागवान (वय-२८) असे पोटच्या मुलांचा जीव घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर, अलफिया अक्रम बागवान (वय-९),  झोया अक्रम बागवान (वय-७) आणि जिआन अक्रम बागवान (वय-६) अशी मृत मुलांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फातिमा अक्रम बागवान या चार दिवसांपूर्वीच भोसरी येथे कुटुंबासह राहण्यास आल्या होत्या. पती अक्रम हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय अगोदर तळेगाव येथे होता. परंतु तिथे मोठे नुकसान झाल्याने ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. रविवारी सकाळी अक्रम हे बाहेर गेले असता पत्नी फातिमा यांनी तिन्ही मुलांना गळफास देत त्यांचा जीव घेतला. यानंतर   स्वतः ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यातच पतीला व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे सर्व होत असताना कुटुंबाची फरफट होत असल्याने नैराश्य आणि गरिबीला कंटाळून आज त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तिन्ही मुलं  सावित्रीबाई फुले या शाळेत शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!