Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : ‘जय श्रीराम’ न म्हटल्याने मुस्लीम मुलांना मारहाण

Spread the love

‘जय श्रीराम’ न म्हटल्याने उन्नावमध्ये एका मदरशातील मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत अनेक मुलं जखमी झाली आहेत. हा हल्ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा मदरशातील लोकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस फेसबुक प्रोफाइलवरून आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत. या हल्ल्यात मदरशातील मुलांच्या सायकलीही तोडण्यात आल्या आहेत.

या घटनेपूर्वी आसाममध्ये बारपेटा जिल्ह्यात चार समाजकंटकांनी तीन मुस्लीम युवकांना मारहाण केली होती. त्यांच्यावर ‘जय श्रीराम’ बोलण्याची सक्ती करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील कानपूर अशीच घटना घडली होती. येथील बर्रा भागात एका मुस्लीम युवकाला काही लोकांनी मारहाण केली होती. आपण टोपी घातली होती आणि ते पाहून काही लोकांनी आपल्याला जय श्रीराम म्हणण्यास सक्ती करण्यात आली असा या युवकाचा आरोप होता.

झारखंडमध्येही बाइक चोरीचा आरोपी तबरेज या २४ वर्षीय तरुणाला एका खांबाला बांधण्यात आले होते. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तबरेजला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्ती करण्यात आली होती. तबरेज बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस कोठडीत त्याचा ४ दिवसांनी मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!