Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Breaking News : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करू शकत नाही , आंबेडकरवाद्यांच्या कळपात संघाचे लोक ? लक्ष्मण माने यांचा आरोप

Spread the love

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहे. आघाडीत संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिलेली नाही, असा खळबळजनक आरोप करत वंचित बहुजन आघाडीतून फारकत घेतलेले वंचितचे महत्त्वाचे नेते लक्ष्मण माने यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडत वंचितमध्ये उभी फूट पडत असल्याचे अधोरेखित केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे सांगताना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली आहे. माने यांच्या आरोपामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांवर माने यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, असं म्हणत लक्ष्मण मानेंनी खळबळ उडवून दिली आहे. मी प्रकाश आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही.

प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही. संघ आणि भाजपाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमध्ये घेतलं आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे लक्ष्मण माने म्हणाले आहेत.

मी तत्त्वापासून कधीच चुकलो नाही, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. यावेळी लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं महासचिवपद दिल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीत मीडियाशी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांशी आघाडी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे दहा जागा गेल्यात. प्रतिगामी पक्षांना मदत हा अधःपात होता आणि तो माझ्याकडून झाला. त्याचा मला पश्चात्ताप आहे. पदरचे पैसे घालून आम्ही काम केलं. मी गोपीचंद पडळकर यांचं नाव सुचवलं, पण ते अध्यक्षांनी माझ्याकडून वदवून घेतलं होतं. लाल दिव्याच्या गाड्या ओवाळून टाकल्यात, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. आंबेडकरवाद्यांच्या कळपात आरएसएसचे लोक कशाला?, असा प्रश्नही लक्ष्मण मानेंनी उपस्थित केला आहे.

आणखी काय म्हणाले माने…

वंचितचे सांगलीतून लोकसभेसाठी उभे राहिलेले गोपीचंद पडळकर हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांनी त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोप माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांना आम्हीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष केले, मात्र त्याच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच वंचितवर भाजपची बी टीम असे आरोप होत असतात. आंबेडकर असे वागल्यामुळेच हे आरोप होत असल्याचे माने म्हणाले. मी कट्टर आंबेडकरवादी असून कधीही आरएसएस, भाजप किंवा शिवसेनेचे समर्थन करू शकणार नाही, असे म्हणत माने यांनी आंबेडकर यांना टोला लगावला. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरूनच आपण प्रवक्तेपदासाठी पडळकरांचे नाव सुचवून त्यांना अनुमोदन दिल्याचे माने म्हणाले.  दरम्यान, आपण प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे.

लक्ष्मन माने राष्ट्रवादीचे हस्तक- पडळकर

लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक असल्याचा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी मानेंवर केला आहे. माने यांचे म्हणणे स्वीकारण्याजोगे नसून त्यांचे दुखणे काही वेगळेच आहे असे पडळकर म्हणाले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!