Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राधाकृष्ण विखे, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ

Spread the love

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदाच्या ‘गिफ्ट’सह भाजपात प्रवेश झाला आहे. मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

नवे कॅबिनेट मंत्री 

राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
संजय कुटे
सुरेश खाडे
डॉ. अनिल बोंडे
डॉ. अशोक उईके
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
तानाजी सावंत (शिवसेना)

नवे राज्यमंत्री

योगेश सागर
अतुल सावे
संजय उर्फ बाळा भेगडे
परिणय फुके
अविनाश महातेकर

मेहतांसह ‘या’ मंत्र्यांना डच्चू

मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे आहेत. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!