Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकर यांच्या सोशल इंजिनियरिंगचा प्रभाव कुठे ? कसा आणि किती ?

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा विजय आणि काँग्रेस राष्ट्रवादींसह विरोधकांचा दारुण पराभव का झाला याची कारणमीमांसा विविध अंगाने केली जात आहे . त्यापैकी वंचित आघाडीच्या फॅक्टरवर अधिक चर्चा होत आहे . काँग्रेस -राष्ट्रवादींसोबत वंचित आघाडी झाली असती तर कोणत्याही परिस्थितीत भाजप -सेनेला महाराष्ट्रात तरी रोखता आले असते आणि त्याचा अधिक फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्वादीसह वंचित बहुजन आघाडीलाही झाला .

एक मात्र आहे कि , महाराष्ट्रात एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे जोरदार फटका बसला आहे. वंचित आघाडीमुळे काँग्रेस आघाडीच्या ९ जागा पडल्या असून त्यात अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे काँग्रेसला बीड, बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, नांदेड, परभणी, सोलापूर आणि यवतमाळमध्ये पराभव पत्करावा लागला. तर हातकणंगले आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. या आठही जागांवर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी १ लाखांपेक्षाही अधिक मतं घेतल्यानं काँग्रेस-स्वाभिमानी आघाडीचा पराभव झाला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींना पराभव पत्करावा लागला आहे.

राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघात उमेदवार देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने नक्कीच लक्षणीय मते मिळवली आहेत. यावेळी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला मात्र विदर्भातील चार दोन मतदार संघ वगळता फारशी प्रभावी मते मिळाली नाहीत . प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सोशल इंजिनीयरिंग करत राज्यात एकूण ४१,३२,६०२ मतं मिळविली आहेत. या सर्व मतदारसंघात २५ हजारांपासून ते ३ लाखापर्यंतची मतं वंचित आघाडीनं घेतली आहेत. अकोल्यामध्ये वंचितने दुसऱ्या तर सोलापूरसह नऊ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकांची मतं मिळविली आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील निवडूनही आले आहेत. ग्रामीण भागात चांगली मतं घेणाऱ्या वंचित आघाडीला मुंबई-ठाण्यात मात्र फारशी मतं मिळालेली नाहीत. भिवंडी, पालघर, ठाणे, कल्याण आणि मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात वंचितला एकूण ४ लाख १३ हजार २ मते मिळाली आहेत.

बीड: प्रीतम मुंडे (भाजप) ६७८१७५, बजरंग सोनवणे (काँग्रेस) ५०९८०७, विष्णू जाधव (वंचित आघाडी) ९२१३९

बुलडाणा: प्रतापराव जाधव (शिवसेना) ५२१९७७, राजेंद्र शिंगणे (काँग्रेस) ३८८६९, बळीराम शिरसकर (वंचित आघाडी) १७२६२७

गडचिरोली-चिमूर: अशोक नेते (भाजप) ५१९९६८, नामदेव उसेंडी (काँग्रेस) ४४२४४२, रमेशकुमार गजबे (वंचित आघाडी)१११४६८

हातकणंगले: धैर्यशील माने (शिवसेना) ५८५७७६, राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी) ४८९७३७, अस्लम सय्यद (वंचित आघाडी)१२३४१९

नांदेड: प्रतापराव चिखलीकर (भाजप) ४८६८०६, अशोक चव्हाण (काँग्रेस) ४४६६५८, यशपाल भिंगे (वंचित आघाडी १६६१९६

परभणी: संजय जाधव (शिवसेना) ५३८९४१,राजेश विटेकर (काँग्रेस) ४९६७४२, अलमगीर खान (वंचित आघाडी) १४९९४६

सांगली: संजय पाटील (भाजप) ५०८९९५, विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी) ३४४६४३, गोपिचंद पडाळकर (वंचित आघाडी) ३००२३४

सोलापूर: सिद्धेश्वर स्वामी (भाजप) ५२४९८५, सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) ३६६३७७, प्रकाश आंबेडकर (वंचित आघाडी) १७०००७

यवतमाळ वाशिम: भावना गवळी (शिवसेना) ५४२०९८, माणिकराव ठाकरे (काँग्रेस) ४२४१५९, प्रवीण पवार वंचित (वंचित आघाडी) ९४२२८

प्रभावी मतदान

१. अकोला: २७८८४८ २. औरंगाबाद: ३८९०४२ ३.  बीड:९२१३९ ४. चंद्रपूर: ११२०७९ ५.  बुलडाणा: १७२६२७ ६.  गडचिरोली-चिमूर: १११४६८ ७.  हातकणंगले:१२३४१९ ८. हिंगोली: १७४०५१ ९.  लातूर : ११२२५५ १०. नांदेड :१६६१९६ ११.  नाशिक : १०९९८१ १२.  उस्मानाबाद : ९८५७९ १३. परभणी : १४९९४६ १४. रावेर : ८८३६५ १५. सांगली : ३००२३४ १६. सोलापूर : १७०००७ १७. यवतमाळ-वाशिम : ९४२२८

आपलं सरकार

Click to listen highlighted text!