Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : सहावा टप्पा : आज ५९ जागांवर मतदान, ९७९ उमेदवार निवडणूक रिंगणात

Spread the love

प्रमुख उमेदवार

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, हर्षवर्धन, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, बॉक्सर विजेंदर सिंग, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, नरेंद्रसिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, रामकृपाल यादव, अश्विनीकुमार चौबे, राजकुमार सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत.

लोकसभा निवडणुकीचं सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या (रविवार) होणार आहे. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतकौल दिला जाणार असून ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे. दरम्यान, या टप्प्यात भोपाळमध्ये मतदान होत असून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिल्याने त्या लढतीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

उत्तर प्रदेशातील १४, मध्य प्रदेशातील ८, बिहारमधील ८, पश्चिम बंगालमधील ८, हरयाणातील सर्व १० आणि दिल्लीतील सर्व ७ जागांवर उद्या मतदान होणार आहे. भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपने या ५९ जागांवर ३५.८ टक्के मते मिळवत ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे.
यावेळी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत होत असून मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.  २०१४ मध्ये दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. राज्यात यावर्षीच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षांनी लोकसभेचं मैदान मारण्यासाठी येथे जोर लावला आहे. हरयाणात भाजपची सत्ता आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधील १४ जागांवर मतदान होत असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची परीक्षा घेणारा हा टप्पा आहे. भाजप, काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडी अशी तिरंगी लढत या १४ जागांवर होत आहे. गेल्यावेळी या १४ पैकी १३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आझमगडची एकमेव जागा सपाकडे गेली होती. मुलायमसिंह यादव यांनी येथे विजय मिळवला होता. यावेळी येथे सपाकडून अखिलेश यादव लढत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!