Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“तुमची झाली युती आणि आमची झाली माती…” ,” नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र, कारण माझ्या ह्रुदयात आहे भीमाचे चित्र. !!

Spread the love

भाजपा – शिवसेना युतीच्या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण म्हणजे उपस्थितांना मोठा विनोद असतो त्यांच्या कविता श्रोत्यांबरोबरोबरच मंचावरील नेतेही एन्जॉय करतात . नागपूरच्या सभेतील त्यांच्या अशाच चारोळ्या हास्य विनोद आणि टाळ्या तर घेऊन गेल्याच पण त्यांच्या मनातील सलही या निमित्ताने जाणवून गेली . जेंव्हा ते म्हणाले “तुमची झाली युती आणि आमची झाली माती…”

विदर्भातील ८ जागांवर गुरुवारी मतदान होणार असून आज मंगळवारी प्रचाराचा शेवट अमित शाह यांच्या सभेने झाला. नागपूरमध्ये अमित शाह यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत रामदास आठवले यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. आठवले यांनी भाषणाची सुरुवातच  आपल्या कवितेने केली ते  म्हणाले, मै नागपूर मे आया हू महायुती को जमाने, चूनके आएंगे कृपाल तुमाने.

नागपूर मध्ये नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. भाजपा आणि शिवसेनेची युती होणार शक्यता त्यावेळी दिसत नव्हती आणि त्यामुळे आठवले समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खुद्द आठवले यांनी जाहीरपणे या दोन मतदार संघातून निवडणूक  लढवायची इच्छा व्यक्त करताना किमान एक तरी जागा आम्हाला द्या अशी विनंती केली होती पण त्यांची हि इच्छा भाजपने पूर्ण केली नाही . अखेर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली आणि आठवले यांचे लोकसभा लढविण्याचे स्वप्न भंग पावले . मंगळवारी नागपूरमधील सभेत ” तुमची झाली युती आणि आमची झाली माती..”  अशा शब्दात त्यांनी आपली  खंत व्यक्त केली.

नितीन गडकरी यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले कि , ” नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र, कारण माझ्या ह्रुदयात आहे भीमाचे चित्र. !! ”  ते असेही म्हणाले कि , राहुल गांधी सातत्याने आमच्यावर टीका करत आहेत असे सांगून ते  म्हणाले कि ,  ” करा तुम्हाला जेवढी करायची असेल नरेंद्र मोदींवर टीका, पचवायची कशी ते माझ्याकडून शिका…” असेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीत तुम्हाला बोलायचं अधिकार आहे. जेवढे तुम्हाला बोलायचं आहे तेवढे बोला, या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी यांचे पोल खोला. गरीबी कशी हटवणार कशी, तुम्ही गरिबांना हटवला. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासोबत होतो, पण तुम्ही माझे सामान बाहेर काढले. मग मी ठरवले की तुम्हाला सत्तेतून बाहेर काढतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आठवले यांनी केलेल्या कवितांना नागपूरकरांनी चांगलीच दाद दिली. “नाना पटोले यांना इथे यायचे असेल तर येऊ द्या, पण निवडणुकीनंतर पुन्हा गोंदियात जाऊ द्या.”  असे अवाहनही  रामदास आठवले यांनी नागपूरातील जनतेला यावेळी केले आहे. “आज विदर्भात आले आहे अमित शाह, विदर्भात आम्ही जिंकणार जागा १०. नाना पटोलेकडे वाकड्या नजरेने पाहा आणि सर्वांनी नितीन गडकरींच्या बाजूने रहा…”  या त्यांच्या काव्यावर तर टाळ्याच टाळ्या पडल्या.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!