होळी खेळण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा अर्नाळाच्या समुद्रात बुडून मृत्यू
वसईच्या पश्चिमेला असलेल्या अर्नाळा येथील समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींचा शोध सुरू आहे. हे सर्वजण होळी साजरी करण्यासाठी आले होते. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी दाखल झाले आहेत. आद्याप शोधकार्य सुरू आहे. तसंच भारतीय तटरक्षक दलाची
वसईच्या पश्चिमेला असलेल्या अर्नाळा येथील समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींचा शोध सुरू आहे. हे सर्वजण होळी साजरी करण्यासाठी आले होते. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी दाखल झाले आहेत. आद्याप शोधकार्य सुरू आहे. तसंच भारतीय तटरक्षक दलाची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती पालघरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
मृतांमध्ये १) निशा कमलेश मौर्या (वय ३६) , २) प्रशांत कमलेश मौर्य (वय १७) ३) प्रिया कमलेश मौर्य (वय १९) ४) कंचन मुकेश गुप्ता (वय ३५) ५) शितल दिनेश गुप्ता (वय ३२) यांचा समावेश आहे . हे सर्व जण अंबाडी रोड वसई पश्चिम येथील रहिवाशी होते .