Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनोहर पर्रिकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी-जितेंद्र आव्हाड

Spread the love

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांन दिली आहे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रिकर अस्वस्थ झाले. दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ओळखलं. त्याचमुळे त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!