रिपाइं ऐक्य होणार असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करू : रामदास आठवले
रिपाइं पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर होऊन, ऐक्य होणार असेल तर प्रकाश आंबेडकरांना पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास आपण प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक येथे रिपब्लिकन पक्षाच्या महासभेत बोलताना केले. भाजप-सेनेची महायुती होताना विश्वासात न घेतल्याने आठवले भाजप-सेनेवर नाराज आहेत. महाराष्ट्रात त्यांनी आधी एक जागा मागितली होती आणि नंतर भाजप-सेनेने त्यांच्या वाट्याची किमान एक जागा द्यावी असे आवाहन केले होते परंतु त्याला कुठलेही उत्तर या दोन्हीही पक्षांच्या नेत्यांकडून अद्याप आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आमच्या समोरचे पर्याय तयार असल्याचे म्हटले होते. त्यात त्यांनी आज पुन्हा रिपब्लिकन ऐक झाल्यावर भाष्य करीत म्हटले कि, रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहोत. त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला सध्या उत्तर मिळत नाही हेविशेष.