Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास राष्ट्रवादीची तयारी

Spread the love

नागपूर : भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊ, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. डॉ। बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी संदर्भात

बोलता ते म्हणाले कि काँग्रेस त्यांना सोबत घेण्यास इच्छुक असून आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकी

त तीन राज्ये हातातून गेल्यावर घाबरलेल्या सरकारला शेतकऱ्यांची आठवण झाली. एका वर्षात सहा हजार मदत व तीदेखील टप्प्याटप्प्याने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.खरे तर सरकारने महिन्याला सहा हजार रुपये द्यायला पाहिजे, असे पाटील म्हणाले. सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, पण त्याऐवजी वर्षाला सहा हजार देऊ केले. संजय गांधी निराधार योजनेतही यापेक्षा जास्त मानधन मिळते, अशी टीका पाटील यांनी केली.येत्या २५ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनात विधेयक मांडून त्यावर चर्चा घडवून आणता आली असती पण मुख्यमंत्र्यांनी असे होऊ दिले नाही, असेदेखील ते म्हणाले.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीवर पाटील यांनी मौन बाळगले. मनसेला आघाडीत घेण्याविषयी कोणतीही चर्चा आजघडीला झालेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

<!– Begin BidVertiser Referral code –>
<script language=”JavaScript”>var bdv_ref_pid=843915;var bdv_ref_type=’i’;var bdv_ref_option=’a’;var bdv_ref_eb=’0′;var bdv_ref_gif_id=’ref_110x32_black’;var bdv_ref_width=110;var bdv_ref_height=32;</script>
<script language=”JavaScript” src=”//cdn.hyperpromote.com/bidvertiser/tags/active/referral_button.html?pid=843915″></script>
<noscript><a href=”http://www.bidvertiser.com”>pay per click</a></noscript>
<!– End BidVertiser Referral code –>

आपलं सरकार

Click to listen highlighted text!